मुंबईसह राज्यात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने सुरू झालीयं. जुईनगर रेल्वे स्टेशनबाहेर पाणीच पाणी साचले आहे. नागरिकांना जुईनगर रेल्वे स्टेशनमध्ये जाण्यासाठी गुडघाबर पाण्यातून जावे लागत आहे.अंधेरी येथील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्याचा फटका परिसरातील अनेक नागरिकांना बसला आहे. नवी मुंबई भागात पाणी साचायला सुरुवात झालीये. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे महत्वाचे काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका अशा सूचना आता प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. मुंबईच्या पावसाचा परिणाम लोकलवरही झाला असून अनेक लोक पावसामुळे लेट धावत आहेत.