राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद… शिवतिर्थावर मोठं घडलं?
काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक धक्कादायक घटना घडली होती. यावर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थ निवासस्थानी भेट घेत लेखी माफीनामा सादर केला.
काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक धक्कादायक घटना घडली होती. यावर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतिर्थ निवासस्थानी भेट घेत लेखी माफीनामा सादर केला. काही दिवसांपूर्वी मालाड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा ध्वज लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. 17 जून 2026 रोजी काही समाजकंटकांनी हा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. मनसेचे विभाग अध्यक्ष महेश मनोहर फरकसे यांच्या आंदोलनानंतर संबंधित ध्वज तात्काळ हटवण्यात आला होता.
यावेळी राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रकारांमुळे समाजात विनाकारण वाद निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
