उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या वेळी राणा दाम्पत्य हे दिल्लीतून हनुमान चालीसा पठण करणार असेल तर त्यांची भूमिका ही चुकीची नाही असे मला वाटते. लोकशाही मद्धे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण ही बाब अत्यंत अन्यायकारक होती. त्यांनी मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना अडवण्याची जबाबदारी पोलिसांची होती त्यांनी अडवलही ते घरातून बाहेरही पडले नाहीत असं असताना त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अन्याय करण ही मुंबई पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची होती.
राजकीय हेतूने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला
कालच दिल्ली येथे राणा दाम्पत्यांची भेट घेऊन रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी असून आपल्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊ.यांची सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास अशी भूमिका मांडत आहे. त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची दिसते आहे. त्यांनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवर चे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदिसमोर हनुमान चालीसा लावू ही गुंडा गर्दी योग्य https://www.tv9marathi.com/wp-admin/users.phpनाही असं रामदास आठवले म्हणाले.