मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार आहेl. यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसाच्या चार ओळी वाचून दाखवण्याचं आव्हान दिलं. मात्र, पत्रकारांनी रवी राणा यांना हनुमान चालिसाच्या चार ओळी बोलण्यास सांगितल्यावर त्यांना बोलताही आल्या नाहीत. बाळसााहेबांच्या विचाराचे सैनिक असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी हनुमान चालिसा वाचू दिला असता. महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत. समस्त हिंदू हे पाहत आहेत, अशी टीका रवी राणा यांनी केली.