एफआरपीच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारविरोधात 5 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून जागर एफआरपीचा, एल्गार ऊस उत्पादकाचा या आंदोलनाला सुरुवात करणार आहे. एफआरपीच्या तीन तुकड्यांचा प्रस्ताव राज्य सरकारनेच दिला आहे. याआधी सहकार मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणारे आता गप्प का? राजू शेट्टी यांचा आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी, असं म्हणत सदभाऊ खोतांनी राजू शेट्टींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.