फक्त भाजप नेत्यांनाच कोर्टात दिलासा कसा मिळतो? मविआच्या नेत्यांना दिलासा का मिळत नाही? असं म्हणत संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर सवाल उपस्थित केलेत. मात्र असं एक कलम आहे ज्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना जामीन मिळत नाहीये. संजय राऊतांनी ज्या पक्षाबाबत सवाल उपस्थित केला तो पक्ष म्हणजे अर्थातच भाजप…! भाजपच्या ज्या ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले, त्या नेत्यांना कोर्टातून दिलासा मिळाला. केवळ भाजपच्या नेत्यांनाच अटकेपासून दिलासा कसा मिळतो. मविआच्या नेत्यांना दिलासा का मिळत नाही? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. शिवाय न्यायव्यवस्थेवरही काही सवाल उपस्थित केलेत. तर दुसरीकडे संजय राऊतांनी न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप नेत्यांनी राऊतांविरोधात
याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलंय.