सोलापूर पोलिसांवर दबाव कोणी आणला हे…; संजय राऊतांचं मोठं विधान
संजय राऊत यांनी नाशिक आणि सोलापूरमधील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि ड्रग्जचा व्यापार वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोलापूरमध्ये पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रकरण उघड झाले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजकीय दबाव आणि जनतेच्या वाढत्या संतापाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक आणि सोलापूर शहरांतील स्थितीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये भ्रष्टाचार, पाणीटंचाई, वाईट रस्ते आणि वाढलेला गुंडगिरी या समस्येवर त्यांनी भाष्य केले आहे. शहरात ड्रग्जचा व्यापारही वाढला असून, तरुणांमध्ये त्याचे प्रमाण चिंताजनक आहे असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणाकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. सोलापूरमध्ये पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रकरण उघड झाल्याचे त्यांनी नमूद केले. राऊत यांनी या समस्येवर शिवसेना आणि मनसे एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
Published on: Sep 12, 2025 10:32 AM
