शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. कोविडच्या काळात फिरता आलं नाही, बंधन होती,तरी राजकारण थांबत नाही. पक्षाची बांधणी करणं आमचं कर्तव्य आहे. सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही. आमच्यासाठी स्वाभिमान महत्वाचा आहे. बाळासाहेबर ठाकरे हे आमच्यासाठी स्वाभिमानाचं दुसरं नावं आहे, असं संजय राऊत म्हणाले.