Sanjay Raut LIVE | कालपर्यंत तुम्ही ईडीमध्ये बसून भाजप चालवत होतात, राऊतांची टीका

| Updated on: Aug 27, 2021 | 12:53 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला टोले लगावला. गेल्या दोन वर्षापासून अती झालं. महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे, असं ते म्हणाले.

Follow us on

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला टोले लगावला. गेल्या दोन वर्षापासून अती झालं. महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे. हा खूप मोठा पक्ष आहे. हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठं काम केलं आहे. आम्ही 25 वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचं योगदान आम्ही जाणून आहे. पण ज्यांना हे माहीत नाही, जे बाहेरून आले आहेत, ते लोक शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला. तसंच कालपर्यंत तुम्ही ईडीमध्ये बसून भाजप चालवत होतात, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.