Sanjay Raut | काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा

| Updated on: Apr 19, 2026 | 12:58 PM

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.

राऊत म्हणाले, ”काल नरेंद्र मोदींनी भाषण केलं, त्यावेळी सबंध भाषणात ८६ वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. ते देशाला काँग्रेसमुक्त करायला निघाले आहेत, मात्र त्यांच्याच नसानसात, रक्तात, शब्दात काँग्रेस आहे. हो, आम्ही एकजूट होऊन विधेयकाला विरोध केला, कारण देशाला काँग्रेसशिवाय योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही, हे मोदी स्वतःच त्यांच्या असल्या कृतीतून दाखवून देतात”, असा आरोप राऊतांनी केला.

पुढे संजय राऊत म्हणाले, ‘लोकसभेच्या ५४३ पैकीच महिलांचं आरक्षण दिलं तर शाहांची जागा जाईल, म्हणूनच या जागा ८०० च्यावर नेण्याचं विधेयक आणलं होतं, महिला आरक्षणाचा यात काडीमात्र संबंध नाही.’

Published on: Apr 19, 2026 12:47 PM
Follow Us