प्रियांका गांधींच्या स्थानबद्धतेवर बोलताना संजय राऊत यांनी मोदी आणि योगी सरकारला खडे बोल सुनावले. तुमचं राजकीय वैर असू शकतं, हे मान्य आहे पण ज्या कुटुंबाने देशासाठी एवढा मोठा त्याग केला आहे, प्रियांका त्या कुटुंबातून येतात. प्रियांका गांधींशी पोलिसांचं वागणं अत्यंत असभ्य होतं. पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली हे सर्वांनी पाहिलं. त्यांचा गुन्हा काय होता ती त्यांना ताब्यात घेतलं गेलं? केवळ राजकारण करायचं म्हणून करु नका, असा सल्लाही त्यांनी मोदी आणि योगी सरकारला दिला.