मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्राकडूनही सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्यानंतर झालेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला. मशिदीच्या भोंग्यावरून त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती. येत्या 1 मे रोजी पुन्हा ते औरंगाबादमध्ये भाषण करणार आहेत. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.