Aaditya Thackeray | 40 वर्षांत आम्ही गद्दारांना खूप काही दिलं – tv9

Aaditya Thackeray | 40 वर्षांत आम्ही गद्दारांना खूप काही दिलं – tv9

aslam shanedivan | Updated on: Aug 25, 2022 | 1:32 PM

हे सरकार बरखास्त करा मग बघू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अधिवेशनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा अकदा शिंदे गटावर निशाना साधला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आधी 40 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूकीला समोरं जावा आव्हानही दिलं आहे. त्याचबरोबर हे सरकार बरखास्त करा मग बघू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याचबरोबर 40 वर्षात आम्ही गद्दारांना खूप काही दिलं. मात्र एका मंत्री पदासाठी त्यांना माझ्यावर बोलावं लागत आहे. त्यांनी ज्यांनी मोठं केलं त्यांच्याच पाठीत गद्दारांनी खंजीर खुपसला. त्यामुळे आपल्याला त्यांची कीव येते असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Aug 25, 2022 1:32 PM
Follow Us