अभ्यासक्रमातील बदलांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटावर केलाय. हा अभ्यासक्रम पूर्वीपासूनच चालत आलेला आहे. त्यात वेळोवेळी तज्ज्ञांनी बदल केला आहे. केवळ अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून भीतीचं वातावरण केलं जात आहे. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत अल्पसंख्याक मतं मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपकडून जातीयवाद पसरवला जात असल्याचा आरोप सतत विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यातच शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर काही गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप केला होता. त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.