बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला कोर्टाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर आंबेगावात पहिली बैलगाडा शर्यत होणार होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक ती थांबवलीय. या प्रकरणामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप आयोजक शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केलाय. कोविड(Covid)च्या सर्व नियमांचं पालन करण्याचंदेखील नियोजन होतं. त्यानंतही ही स्थगिती दिल्यानं स्थानिकांत मात्र नाराजी आहे.