अमरावतीच्या प्रकरणी राजकारण करण्यात येवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा, असं शिवसेना (Shiv Sena) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी म्हटलंय. याप्रकरणी आमदार रवी राणा, नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर सावंत बोलत होते. शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. ते आदर्श राजे होते. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणं म्हणजे प्रेम नाही, तर त्यांच्या आदर्शावर चालणं हे खरं प्रेम आहे, असंही ते म्हणाले.