नागपूर: नागपूरची माती आणि वातावरण चांगलं आहे. राऊतांनी वारंवार विदर्भात यावं. त्यामुळे त्यांना कदाचित सुबुद्धी सूचेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला होता. त्यावर राऊतांनी पलटवार केला हे. फडणवीस नागपूरचे सुपुत्र आहेत. त्यांना काल तुम्ही लोकांनी प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं असं आहे की नागपूरमध्ये आल्यावर राऊतांना सदबुद्धी मिळेल. आम्हाला सुबुद्धी मिळेल असं वाटतं तर तुम्हाला का नाही मिळाली? तुम्हाला अडीच वर्षापूर्वी मिळाली असती तर देशाचं राज्याचं राजकारण वेगळ दिसलं असतं. कदाचित तुम्ही मुख्यमंत्री असता, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.