बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आम्ही कोणाला घाबरत नाही, कायदा आम्हालाही माहिती आहे असं जरी म्हणत असले तरी, 12 बंडखोर आमदारांना विधिमंडळा कार्यालयाकडून नोटीस काढू शकतात असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. त्यामुळे पक्षप्रमुखांनी बंडखोर आमदारांना तुम्ही परत या असं आवाहन करण्यात आले आहे. गुवाहाटीत गेलेले आमदारांना डांबून ठेऊन मागण्या करणे, आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचे असल्याचेही अंबादास दानवे यांनी सांगितले.