Vinayak Raut | आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहितीय, पोस्टरबाजीची गरज नाही : विनायक राऊत

Vinayak Raut | आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहितीय, पोस्टरबाजीची गरज नाही : विनायक राऊत

| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 9:47 AM

आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहितीय, पोस्टरबाजीची गरज नाही, असं विनायक राऊत म्हणालेत. पोस्टरबाजीच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलंय.

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाच्या  श्रेयवादावरुन लढाई सुरु असलेली पाहायला मिळतीय. राणे समर्थकांचं म्हणणं आहे नारायण राणे यांनी विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणल्या आहेत. तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनी विमानतळासाठी खस्ता खाल्ल्या असल्याचं सेनेचं म्हणणं आहे. आम्ही चिपी विमानतळासाठी काय केलंय ते लोकांना माहितीय, पोस्टरबाजीची गरज नाही, असं विनायक राऊत म्हणालेत.