Team India T20 List | श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी…. सविस्तर माहिती
भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची टी20 संघ घोषणा केली असून श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची टी20 संघ घोषणा केली असून श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून त्याला संघातही स्थान मिळालेलं नाही. तिलक वर्मा याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि सचिव देवजित सैकिया यांनी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन 16 सदस्यीय संघ जाहीर केला. या मालिकांमध्ये नव्या चेहऱ्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची प्रथमच वरिष्ठ भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएल 19 व्या मोसमातील शानदार कामगिरीमुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, हर्षित राणा आणि रवी बिश्नोई यांचा समावेश करण्यात आला आहे.
