“उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते रश्मी ठाकरेंवर दबाव आणत होते”

| Updated on: Apr 30, 2023 | 11:56 AM

Aditya Thackeray Uddhav Thackeray : महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद आणि आदित्य ठाकरे; कुणा साधला निशाणा? पाहा व्हीडिओ...

Follow us on

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते. तेव्हा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यासाठी तो स्वतःच्या आईवर दबाव आणत होता. जोपर्यंत माझं नाव पुकारलं जात नाही. तोपर्यंत दाओसमधून येणार नाही, असं म्हणाला होता”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. काल आदित्य ठाकरेंनी उल्लेख केला की. नितेश राणेंपेक्षा माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यावरही नितेश राणे बोलले आहेत. हो ना तुझ्यावर चांगले संस्कार झाले असते तर दिशा सालियन जिवंत असली असती, असं नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. याचसोबत संजय राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.