मुंबईमुळे उत्तर प्रदेशच्या शमशाद खान यांचा जीव वाचला. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी 50 च्या खाली आली होती. पण त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशात ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. अशा परिस्थितीत तब्बल 1500 किमीचा प्रवास करुन शमशाद खान मुंबई गाठली आणि आता ते अगदी ठणठणीत बरे झाले. या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !