मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरुच आहे. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाराच्या मुद्द्यावर हे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत एसटीचे विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. तर दुसरीकडे न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतरच एसटीच्या विलीनीकरणावर चर्चा आणि प्रक्रिया पुढे जाईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता समितीचा आहवाल येईपर्यंत महाराष्ट्र एसटीविनाच धावणार का ? असे विचारण्यात येत आहे.