नांदेड : अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी राजकारण आणि धर्माबाबत महत्वाचं विधान केलं आहे. धर्मात राजकारण असू नये पण राजकारणी धार्मिक असावा, असं मत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलंय. नांदेडमध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात सद्य परिस्थितीवर रविशंकर यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलंय. संतामध्ये तर कुठलंच राजकारण नसतं, असंही रविशंकर यावेळी म्हणालेत.