रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर पुन्हा त्यांची जामिनावर सुटका झाली. पोलिसांच्या या कारवाईमुळे भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजपने केलाय. त्यातच राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या सतत संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येतोय.