कोल्हापूर : राजकारण करायला वेगवेगळी क्षेत्रं आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य नाही यात राजकारण करू नये. जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. माणसाच आयुष्य कोणत्याही पक्षाला बांधील नाही. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनचं राजकारण थांबवा, असा इशारा खासदार संभाजीराजेंनी दिला आहे.