मुंबईप्रमाणे राज्यातील इतर शहरांना करात सवलत मिळेल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. राज्यातील सामान्य नागरिकांना महाविकासआघाडी करातून मुक्त करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई आणि ठाणे महापालिकेतील पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना कर मुक्त करण्याचा महा विकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे. मुंबई ही सुरुवात असून शहर राज्यातील इतरही शहरांना अशी सवलत देणार असल्याचे संकेत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.