नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज नगरमध्ये होते. यावेळी विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर नितीन गडकरींनी नगरकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा 548 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक, जामखेड ते सौताडा या रस्त्याचं 135 कोटीचं काम आणि जामखेड शहरातून जाणारा जामखेड ते बीड जोडणारा महत्त्वाचा मार्ग मी अॅन्यूअल प्लॅनमध्ये मंजूर करत आहे. त्याचं काम लगेच सुरू होईल. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा दौंड-मनमानमाड रेल्वे मार्गावर आहे. निम्मन गाव येथे रेल्वे उड्डाण पुलाचं काम मी मंजूर करत आहे. हे काम लवकर सुरू होईल. तसेच कोपरगाव ते सावळी विहीर हे मालेगाव-मनमाड-अहमदनगर हा दक्षिण व उत्तरेला जोडणारा अवजड वाहनांचा रस्ता आहे. शिर्डीला जोडणारा हा रस्ता आहे. त्याचंही काम मी मंजूर करत आहे. त्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी घोषणा गडकरी यांनी केली.