शहरात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसक कारवायांमध्ये (Amaravati Riots) फक्त भाजप कार्यकर्त्यांनाच दोषी धरून त्यांच्यावरच कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमरावती दौऱ्यावर असताना फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हे वक्तव्य केले आहे. अमरावती शहरातील पोलीस राजकीय दबावापायी एकतर्फी कारवाई करत असून त्यांचे धोरण असेच राहिले तर आम्हाला निषेध करावा लागेल, विरोध करावा लागेल. अमरावती पोलीस आणि प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून आम्ही जेलभरो आंदोलन करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.