मुंबई – काश्मिरची स्थितीला वाईट आहे. काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे(maharashtra ) दरवाजे कायम उघडे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सांगितले आहे, की काश्मिरी पंडितासाठी (kashmiri Pandit)जी काही मदत लागेल ती आम्ही करू असे सांगितले आहे. मात्र सद्यस्थितीला तिथली जी काही परिस्थिती आहे. ती फार भयावह आहे या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या बरोबर नाहीत. असे मत शिवसेना आदित्य ठाकरे (aditya Thackeray) यांनी व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने काश्मीरी पंडितांची हत्या केली जात आहे . यामुळे काश्मीरमधील नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे