पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊत यांच्या अडचणीत वाढ, ईडी ची न्यायालयाकडे कोणती मागणी?

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊत यांच्या अडचणीत वाढ, ईडी ची न्यायालयाकडे कोणती मागणी?

aslam shanedivan | Updated on: Jun 28, 2023 | 1:16 PM

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) ने त्यांच्याविरोधात सुरू असल्येला केसमध्ये मोठी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रमकरणी 100 दिवस तुरूंगात राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना तुरूंगात जावं लागतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) ने त्यांच्याविरोधात सुरू असल्येला केसमध्ये मोठी मागणी न्यायालयाकडे केली आहे. जर न्यायालयाने ती मान्य केली तर त्यांनी पुन्हा तुरूंगात जावं लागणार आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्यात त्यांना सत्र न्यायालयाने जामिन दिला असून ते बाहेर आहेत. त्यावरून ईडीने तो जामिन ना मंजूर करावा अशी मागणी केली आहे. तर याप्रकरणाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

Published on: Jun 28, 2023 1:16 PM
Follow Us