‘केडीएमसी’ निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढणार – जयंत पाटील

| Updated on: Dec 18, 2021 | 10:31 AM

गेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी काही नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow us on

मुंबई :  गेल्या केडीएमसीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी काही नगरसेवक हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेण्यात येईल, तसेच येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या देखील वाढलेली असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.