मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आल्याने 25 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंबधी राज्य सरकार निर्णय़ घेऊ शकते. असे झाल्यास संबधित जिल्ह्यातील व्यवहार आणखी मोठ्या प्रमाणात सुरु होऊ शकतात.