VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 27 June 2021

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 27 June 2021

| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 12:56 PM

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नासल्याचा दावा भाजपकडून  सातत्याने केला जातो.

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नासल्याचा दावा भाजपकडून  सातत्याने केला जातो. मात्र, हे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. पुढे शरद पवार म्हणाले की, स्वबळावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येकजण आप-आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न आहे.

तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे, यामुळे सरकार व्यवस्थित चालत आहे आणि पुढेही चालणार असल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. राष्ट्रमंचचे नेते या बैठकीला उपस्थित राहिले होते. या बैठकीत राष्ट्रमंचचे नेते यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्यासह 15 पक्षांचे नेते उपस्थित होते.