महाराष्ट्रात आजपासून निर्बंध लागू झाले आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी व्यापारी आणि प्रशासनामध्ये वाद झाला. कोणत्याही परिस्थितीत दुकाने बंद ठेवणार नसल्याची भूमिका काही संघटनांनी घेतली. कोल्हापूर, इचलकरंजी, जळगावात व्यापारी आक्रमक झाले. कोल्हापूरच्या व्यापाऱ्यांनी तर सरकारला दोन दिवसात याबाबत निर्णय घ्या, असा इशारा दिला आहे. (traders protest against Maharashtra Government over corona restriction)