Uddhav Thackeray | कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

| Updated on: Mar 06, 2026 | 5:30 PM

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारने सांगितले. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारने सांगितले. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आणखी काही योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारवर टीका करत हा अर्थसंकल्प शेतकरी आणि कामगारांसाठी निराशाजनक असल्याचे म्हटले. ठाकरे म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांचे सरकार पाडले गेले, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, पण अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही. ठेकेदारांसाठी मात्र सविस्तर योजना सांगितल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प विकासाचे स्वप्न दाखवणारा आहे, पण प्रत्यक्षात शेतकरी आणि कामगारांना फारसा फायदा होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Published on: Mar 06, 2026 05:30 PM
Follow Us