मुंबई – भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane ) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे(Shivsena) नाव आता शिल्लक सेना असं करून घ्याव असे त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासह शिवसनेच्या आमदारानी बंड केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातून महाविकास आघाडी सरकार , शिवसेना व भाजप (BJP)यांच्या शाब्दिक चमकम उडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने या बंडात सामील झाल्याने शिवसेनेवर मोठी नामुष्की ओढवलेली दिसून आलेली आहे.