एकनाथ खडसे आणि भाजप, भाजपच्या नेत्यांमधून आता साधा विस्तवही जात नाही ही परिस्थिती असतानाच भाजपचे आमदार गिरीश महाजनांनी मात्र पंगतीला बसले आणि लाडूच संपले अशी टीका करत त्यांच्या मविआचे सरकार गेल्याने खडसे यांच्यावर टीका केली. त्या टिकेला प्रत्युत्तर देताना मात्र एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनानी आयुष्यभर माझीच पादत्राणे उचलली आणि राजकारण केले असल्याची टीका केली. त्यामुळे आता हे राजकीय युद्ध थांबणार की आणखी पेटणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. एकनाथ खडसे यांनी आता भाजपसह त्यांच्या नेत्यांवर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे.