मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते एकमेकांना भेटत आहेत. यावर मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. राजकारणात अशा भेटगाठी होत असतात. त्याला वेगळा अर्थ लावण्यात अर्थ नाही. त्या भेटीमध्ये आपण सहभागी नसतो. प्रत्येक भेटीचा वेगवेगळा अर्थ असतो. त्यामुळे प्रत्येक भेटीला राजकीय दृष्टीने बघू नये, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.