माझ्या मोझरी मध्ये राममंदीर आहे. रामाच्या नावाने खूप राजकारण सध्या देशात होत आहे. मी तर कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही. माझ्या समोर खुद्द पंतप्रधान जरी आले तरी रामरामच म्हणणार असल्याचं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. माझ्या घरातील मंदिर 400 वर्ष जून आहे. मी कधीच धर्माच्या नावाने राजकारण केलं नाही करणार नाही. रामराम म्हटलं की आपुलकी असते आणि जयश्री राम म्हटलं की ते राजकारण असते असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.