AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना प्रतिक्षा 12 व्या हप्त्याची, ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केल्यावरच पैसे खात्यावर होणार जमा..!

'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आता. आता 31 जुलै ही तारिख ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वीच ही प्रक्रिया करणे महत्वाचे आहे.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना प्रतिक्षा 12 व्या हप्त्याची, 'ही' प्रक्रिया पूर्ण केल्यावरच पैसे खात्यावर होणार जमा..!
पीएम किसानImage Credit source: tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 18, 2022 | 6:06 AM
Share

मुंबई : देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी (Central Government) केंद्र सरकारच्या (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाला आहे. आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत आहेत ते 12 व्या हप्त्याचे. सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत हा हप्ताही शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा होणार आहे. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांना (e-KYC) ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तरच 2 हजार रुपयांचा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. केंद्राने याबाबत सातत्याने जनजागृती केली असून मुदतही दोन वेळा वाढवून दिली आहे. आता शेतकऱ्यांना ही प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार असून शेतकऱ्यांनी ई-केवायसी हे अपडेट किंवा नव्याने नाही केले तर शेतकऱ्यांना 12 हप्त्याला मुकावे लागणार आहे.

 दोन वेळेस मुदत वाढ

‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आता. आता 31 जुलै ही तारिख ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वीच ही प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. pm kisan.gov.in या केंद्राच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनही ई-केवायसी करता येणार आहे.

12 वा हप्ता केव्हा होणार जमा?

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा या योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये जमा केले जातात. यामध्ये 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान पहिला हप्ता, 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान दुसरा हप्ता तर तिसरा हप्ता हा 31 डिसेंबरपर्यंत जमा केला जातो. त्यानुसार आता बारावा हप्ता हा ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यापूर्वीच शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

असे करा ‘ई-केवायसी’

*आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. *आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....