AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसामुळे 12 लाख हेक्टरावरील खरिप पाण्यात, सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे राज्यातील तब्बल 12 लाख हेक्टरावरील पिक पाण्यात गेले आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. असे असताना पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता प्रतिक्षा आहे ती मदतीची

पावसामुळे 12 लाख हेक्टरावरील खरिप पाण्यात, सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात
शेतामध्ये पाणी साचून खरिपीतील पिकाचे अशाप्रकारे नुकसान झाले आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 10, 2021 | 10:14 AM
Share

औरंगाबाद : दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली मध्यंतरी झालेल्या पावसामुळे राज्यातील तब्बल 12 लाख हेक्टरावरील पिक पाण्यात गेले आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. असे असताना पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता प्रतिक्षा आहे ती मदतीची.

उत्पादनाच्या दृष्टीने खरिप हंगामच महत्वाचा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. गतवर्षीही पावसाचाच परिणाम खरिप हंगामातील दरावर झाला होता. दिवसेंदिवस उत्पादनावरील खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे उत्पन्न मात्र घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. चार दिवस झालेल्या पावसात केवळ पिकाचेच नाही तर इतर बांबीचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेकडो जनावरे ही बेपत्ता झाली आहेत. तर मराठवाड्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेले तसेच अन्य दुर्घटनांमध्ये 30 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतीला बसलेला आहे. गतवर्षी खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा अधिकच्या दराने बियाणांची खरेदी केली. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली. त्यामुळे दुबार पेरणीचेही संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. परंतु, उत्पादनाच्या दृष्टीने खरिपात सोयाबीन, उडीद, मूग ची लागवड केली. पिक जोमात असतानाच राज्यात पावसाने हाहाकार केला खरिपाच्या पिकासह फळबागांचेही नुकसान झाले आहे.

30 नागरिकांचा बळी

चार दिवस झालेल्या पावसामध्ये पिकाचे तर नुकसान झाले आहेच शिवाय मनुष्यहानीही झाली आहे. मराठवाड्यासह इतर भागात 30 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान तर झालेच आहे परंतु भविष्यात न भरुन निघणारे नुकसान नागरिकांचे झाले आहे.

आता मदतीची प्रतीक्षा

सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव, नुकसानीची माहिती देणे यामध्ये शेतकरी गांगारुन गेला आहे. परंतु, ही सर्व खटाटोप केवळ पिकाच्या नुकसानीसाठी आहे. पिकाबरोबरच इतरही अनेक बाबींचेही नुकसान झाले आहे. परंतु, शेतकरी आगोदर प्रशासनाची मदत पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करीत आहे.

शेतकऱ्यांवरील टांगती तलवार कायम

खरिपाचे पिक वावरात असतानाच झालेल्या पावसामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे. पण सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील आठवड्यात मराठवाड्यात आणि खानदेशात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तिवण्यात आला आहे.

संबंधित इतर बातम्या :

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

दुष्काळात तेरावा : पावसाचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही होणार, शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?