Bhandara : पीक पध्दतीमध्ये बदल, धान शेतीला मकाचा उत्तम पर्याय, कमी खर्चात अधिकचे उत्पादन

धान पीक हे भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. या पिकावरच येथील सातही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, काळाच्या ओघात आता येथील शेतकरीही पीक पध्दतीमध्ये बदल करीत आहे. रब्बी हंगामातील मका हा धान पिकाला सक्षम पर्याय उभा राहत असून गेल्या दोन वर्षापासून हा प्रयोग शेतकरी करीत आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धान शेतीवर कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली असून हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होताना पाहवयास मिळत आहे.

Bhandara : पीक पध्दतीमध्ये बदल, धान शेतीला मकाचा उत्तम पर्याय, कमी खर्चात अधिकचे उत्पादन
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 3:25 PM

भंडारा :  (Paddy Crop) धान पीक हे भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. या पिकावरच येथील सातही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, काळाच्या ओघात आता येथील शेतकरीही पीक पध्दतीमध्ये बदल करीत आहे. रब्बी हंगामातील (Maize Crop) मका हा धान पिकाला सक्षम पर्याय उभा राहत असून गेल्या दोन वर्षापासून हा प्रयोग शेतकरी करीत आहेत. निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धान शेतीवर (Pest outbreak) कीडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली असून हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होताना पाहवयास मिळत आहे. धान शेतीमध्ये अधिकचा खर्च अन् उत्पादन कमी अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार हा बदल केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी मक्याचे उत्पादन घेतले गेल्याने अजून क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

कमी खर्चात अधिकचे उत्पादन

पाण्याची उपलब्धता असल्यावर मक्याचे उत्पादन पदरी पडतेच शिवाय या पिकावर कीड-रोगराईचा प्रादुर्भाव हा जाणवत नाही. त्यामुळे खर्चही कमी होतो. जिल्ह्यातील लाखनी, साकोली तालुक्यात मक्याचे क्षेत्र वाढत आहे. चार महिन्यांमध्ये हे पीक पदरात पडते. शिवाय अधिकच्या मशागतीचीही गरज नाही. एकरी 30 ते 35 क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असल्याने धान शेतीला हा उत्तम पर्याय उभा राहत आहे. पाण्याची उपलब्धता असल्यावर कमी खर्चात अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.

धान पिकासाठी मूबलक पाणी

धान पिकांमध्ये सर्वाधिक भात शेतीचा सहभाग आहे. याकरिता पाण्याची आवश्यकता तर आहेच पण दिवसेंदिवस वातावरणात होत असलेल्या बदलामुळे किडीचाही प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी मकाची लागवड केली आहे. उन्हाळ्यात धान शेतीसाठी तर अधिकचे पाणी लागते. त्यामुळेच भाताचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणत मक्याचे उत्पादन झाले होते.त्यामुळे मका शेतकऱ्यांना धान पिकाला चांगला पर्याय म्हणून मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.

शासकीय मदतही वेळेत नाही

निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षी धान शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना थेट बोनस द्यायचा की एकरी मदत यावरच अजून एकमत झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी झालेली आहे. या सर्व बाबींना त्रासून शेतकरी आता पीक पध्दतीमध्येच बदल करीत आहेत.

संबंधित बातम्या  :

Success Story : अतिरिक्त ऊसाचा प्रश्नच बनला शेतकऱ्यांच्या उद्योगाचे कारण..! वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न, वाचा सविस्तर

Latur Market : सोयाबीन-हरभरा आवकमध्ये सातत्य, आठवड्याच्या पहिल्या दिवशीचे दर काय ?

अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे परराज्यात शेती घेण्याची नामुष्की, आता तर शेती सोडून देण्याची वेळ,नेमके कारण काय?

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.