AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton : कापूस दरवाढीला ‘ब्रेक’, आता साठवणूक की विक्री..! शेतकऱ्यांनी नेमके करावे काय ?

यंदाच्या हंगामात बाजारपेठेतली सुत्रे बदलायला भाग पाडणाऱ्या कापसाचे दर हे गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले आहेत. नेमकं मागणी असतानाही अशी परस्थिती का ओढावली असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल पण सध्याच्या युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर हे स्थिर झालेले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये कापसाला विक्रमी असा 11 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. मात्र, सध्या कापूस हा 8 ते 10 हजार दरम्यान स्थिरावलेला आहे.

Cotton : कापूस दरवाढीला 'ब्रेक', आता साठवणूक की विक्री..! शेतकऱ्यांनी नेमके करावे काय ?
युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर हे स्थिरावले आहेत.
| Updated on: Mar 08, 2022 | 1:44 PM
Share

पुणे : यंदाच्या हंगामात बाजारपेठेतली सुत्रे बदलायला भाग पाडणाऱ्या (Cotton Rate) कापसाचे दर हे गेल्या काही दिवसांपासून स्थिरावलेले आहेत. नेमकं मागणी असतानाही अशी परस्थिती का ओढावली असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल पण सध्याच्या (war-like situation) युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर हे स्थिर झालेले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये कापसाला विक्रमी असा 11 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. मात्र, सध्या कापूस हा 8 ते 10 हजार दरम्यान स्थिरावलेला आहे. त्यामुळे (Cotton Stock) कापसाची साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. परंतू, युध्द थांबल्यानंतर पुन्हा बाजारपेठेतले दर सुधारतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सध्याची परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी बघ्याची भूमिका घेऊन योग्य वेळ येताच विक्री करणे उचित ठरणार आहे.

युध्दजन्य परस्थितीचा नेमका परिणाम काय?

रशिया आणि युक्रेन यांच्यात युध्दाला सुरवात होताच कापसाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. पण पुन्हा स्थिरावले आहेत. युध्द हे दोन देशातच असल्याने जगभरातील बाजारपेठेवर परिणाम होईल असे चित्र नाही. त्यामुळे आता घसरण तर होणार नाही पण भविष्यात कापसाचे दर वाढणार आहेत. हे युध्द जागतिक पातळीवर पसरते की काय अशी परस्थिती निर्माण झाल्याने बाजारपेठेतही अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, फंडामेंटल्स कापूस दरवाढीसाठी पोषक असल्याचे सांगितले जात आहे.

दर घसरले पण मागणी होताच वाढलेही

विश्व युध्द होण्याच्या भीतीने मध्यंतरी कापसाचे दर हे घसरले होते. मात्र, ही घसरण तात्पूरती होती. आता मागणी सुरु होताच पुन्हा जैसे थे परस्थिती झाली आहे. यंदा मूळ उत्पादनातच घट झाली आहे. त्यामुळे दरवाढ होणार हे निश्चित आहे. देशांतर्गत बाजारपेठेत अजूनही मागणी टिकून आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणेच दर होती असा अंदाज व्यापारी अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.

असा झाला दरात फरक

यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच कापासाला अधिकचा दर आहे. मात्र, या परस्थितीमुळे 8 ते 10 हजार 500 वर असलेला कापूस गत आठवड्यात 4 ते 7 हजारापर्यंत आला होता. यानंतर मात्र, कापूस दराने पुन्हा पुर्वतातळी ही गाठलेली आहे. यंदाच्या हंगामात गेल्या 10 वर्षात जो दर मिळाला नाही तो मिळाला आहे. शिवाय मागणीत घट झालेली नाही. केवळ निर्माण झालेल्या परस्थितीचा हा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता टप्प्याटप्याने विक्री केली तर अधिकचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या :

कलिंगड उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’, दोन वर्ष नुकसानीचे, यंदा दोन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल

पीकविम्याची झळ ग्रामपंचायतीपर्यंत, बीडमधील 100 ग्रामपंचयातीसमोर शेतकऱ्यांचा ‘आक्रोश’

प्रश्न एका संरक्षण भितींचा नुकसान मात्र कोट्यावधीचे, काय आहेत नांदूरमेश्वर धरणालगतच्या शेतकऱ्यांच्या समस्या?

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.