AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैद्यनाथ सुरु मग पनेगश्वर शुगर मिल्सकडे मुंडे कुटुंबियांचे दुर्लक्ष का ? पगारासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

दोन दिवसांपूर्वीच परळी येथील पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे. असे असताना मात्र, पंकजा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या लातूर जिल्ह्यातील पनेगश्वर मिल्सच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. आता पर्यंत शेतकऱ्यांच्या रोषामुळे कारखाने बंद असल्याचे पाहिले होते पण ही शुगर मिल कर्मचाऱ्यांचेच वेतन थकीत असल्यामुळे अडचणीत आहे.

वैद्यनाथ सुरु मग पनेगश्वर शुगर मिल्सकडे मुंडे कुटुंबियांचे दुर्लक्ष का ? पगारासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील पनेगश्वर कारखान्यासमोर वेतन मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन सुरु आहे.
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 6:46 PM
Share

लातूर : दोन दिवसांपूर्वीच परळी येथील पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ ( Sugar Factory) साखर कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे. असे असताना मात्र, पंकजा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या (Latur) लातूर जिल्ह्यातील पनेगश्वर मिल्सच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे. आता पर्यंत शेतकऱ्यांच्या रोषामुळे कारखाने बंद असल्याचे पाहिले होते पण ही शुगर मिल कर्मचाऱ्यांचेच वेतन थकीत असल्यामुळे अडचणीत आहे. गेल्या 31 महिन्यांचा पगारच येथील कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे अगोदर पगार आणि मगच कारखाना सुरु करा अशी भूमिकाच कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे प्रशासन काय तोडगा काढतंय हे पहावे लागणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या काय आहेत अडचणी

लातूर जिल्ह्यातील पानगावर येथे पनेगश्वर साखर कारखाना आहे जो पंकजा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असतो. मात्र, या कारखान्यात कामाला असलेल्या तब्बल 450 कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 32 महिन्यांपासून झालेला नाही. अनेक वेळा मागणी करुनही पगार पदरी न पडल्याने आता ऐन गाळपाच्या प्रसंगी संचालकाची कोंडी करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत थकीत पगार मिळणार नाही तोपर्यंत कारखान्याचे कामकाज केले जाणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. तिकडे परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांच्याही पगारी करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

सात दिवसांपासून अर्धनग्न अंदोलन

तब्बल 450 कर्मचाऱ्यांचे 31 महिन्याचे वेतन या पनेगश्वर साखर कारखान्याकडे थकीत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल आता कर्मचारी विचारीत आहेत? गेल्या सात दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे आता गाळप सुरु होण्याच्या तोंडावर तरी हा प्रश्न मार्गी लागणार का हे पहावे लागणार आहे. पगार बेरोबर भविष्य निर्वाह निधी भरून घ्यावा, अश्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

गाळप हंगाम मध्यावर तरीही अडचणी कायम

ऊसाचा गाळप हंगाम सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. आता पर्यंत थकीत एफआरपी मुळे साखर कारखाना बंद असल्याचे निदर्शनास आले होते. पण कर्मचाऱ्यांमुळेच साखर कारखाना सुरु होण्यास अडसर निर्माण होणार ही पहिलीच वेळ असेल. पण अडीच वर्ष पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांवर ही आंदोलनाची वेळ आलेली आहे. तब्बल 450 कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

संबंधित बातम्या :

रब्बीतील मुख्य पिकालाच शेतकऱ्यांनी निवडला नवा पर्याय, का घटतेय ज्वारीचे क्षेत्र ?

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहे बाजारातील चित्र?

कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना ‘अल्टीमेटम’ : आठवड्याभरात शेतकऱ्यांनी केलेले दावे निकाली काढा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.