Pomegranate : उभ्या डाळिंब बागेवर फिरवला नांगर, पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम..!

बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. यापूर्वी पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. शिवाय पावसामध्येही फळबागा जोपासण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदलामुळे डाळींबावर कीड आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा सुरुच होता. उत्पादनापेक्षा बागा जोपासण्यावरच अधिकचे पैसे खर्ची होत असल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

Pomegranate : उभ्या डाळिंब बागेवर फिरवला नांगर, पाऊस होऊनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम..!
तेल्या रोगामुळे डाळिंबाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांने बाग मोडली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 4:39 PM

लासलगाव : (Climate Change) बदलत्या वातावरणाचा परिणाम केवळ (Kharif Crop) हंगामातील पिकांवरच झाला असे नाहीतर यामधून फळबागांचीही सुटका झालेली नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाबरोबर आता (Pomegranate garden) डाळिंब बागांचेही क्षेत्र वाढत आहे. पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गाच्या लहरीपणासमोर शेतकरी हा हताश झाला आहे. उत्पादनात होणारी घट ही कशीही भरुन काढली जात होती पण दरवर्षी उत्पादनापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याने येवला तालुक्यातील एरंडगाव येथील सतीश ठोंबरे या शेतकऱ्याने 5 एकरातील डाळिंब बाग अक्षरश: नांगरुन टाकली आहे. नुकसान होण्यापेक्षा क्षेत्र रिकामे राहिले तरी चालेल असे म्हणत ठोंबरे यांनी हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत द्राक्ष उत्पादक हे अडचणीत होते पण आता डाळिंब बागायतदारही त्रस्त झाले आहेत.

रोगराईमुळे बागाचे नुकासन

बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. यापूर्वी पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. शिवाय पावसामध्येही फळबागा जोपासण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदबदलत्या वातावरणाचा परिणाम थेट उत्पादनावर होऊ लागला आहे. यापूर्वी पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार होता तो फळबागांचा. शिवाय पावसामध्येही फळबागा जोपासण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदलामुळे डाळींबावर कीड आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा सुरुच होता. उत्पादनापेक्षा बागा जोपासण्यावरच अधिकचे पैसे खर्ची होत असल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. लामुळे डाळींबावर कीड आणि रोगराईचा प्रादुर्भाव हा सुरुच होता. उत्पादनापेक्षा बागा जोपासण्यावरच अधिकचे पैसे खर्ची होत असल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. तेल्या रोगामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने हा निर्णय घेऊन 5 एकर क्षेत्र रिकामे केले आहे.

तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

वातावरणातील बदलामुळे डाळिंब फळबागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे गतवर्षीचे नुकसान यंदा भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पण आता पावसाने उघडीप देताच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगराई व नैसर्गिक आपत्तीचा फटका या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे. त्यामुळेच त्यांनी अधिकचे नुकसान करुन घेण्यापेक्षा बागच मोडली आहे.

हे सुद्धा वाचा

सभागृहात होणार प्रत्यक्ष मदत रक्कम वाटपाची घोषणा

गेल्या अनेक दीड महिन्यापासून राज्यात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण फळबागाही आडव्याच आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीक करावा या मागणीसाठी विरोधक हे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. घोषणा झाली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत सोमवारी घोषणा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमकी कधी रक्कम जमा होणार याबाबत सांगितले जाणार असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.