AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडीच हजार हेक्टरावरील ऊस भुईसपाट, बागायतदार शेतकरीही अडचणीत

ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणऱ्या मांजरा नदी काठच्या ऊसालाही वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा फटका बसलेला आहे. जिल्ह्यातील 59 गावच्या शिवारातील ऊस हा भुईसपाट झाला आहे. त्यामुळे खरिपातील नगदी पिकाबरोबरच बागायती क्षेत्रालाचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अडीच हजार हेक्टरावरील ऊस भुईसपाट, बागायतदार शेतकरीही अडचणीत
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 09, 2021 | 5:53 PM
Share

लातुर : ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणऱ्या मांजरा नदी काठच्या ऊसालाही वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा फटका बसलेला आहे. जिल्ह्यातील 59 गावच्या शिवारातील ऊस हा भुईसपाट झाला आहे. त्यामुळे खरिपातील नगदी पिकाबरोबरच बागायती क्षेत्रालाचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. औसा, रेणापूर, लातूर या तालुक्यांमध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी तर समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. शिवाय अनुकूल वातादरण असल्याने ऊसाची वाढही जोमात होती. मात्र, चार दिवस झालेल्या पावसामुळे उभा ऊस आडवा झाला आहे. नुकसानीनंतर कृषी विभागाच्यावतीने पाहणी करुन अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये लातुर तालुक्यात 47 गावातील 1 हजार 938 हेक्टरावरील नुकसान झाले आहे. तर रेणापूर तालुक्यातील 10 तर औसा तालुक्यातील 2 गावातील ऊसाचे फड हे आडवे झाले आहेत.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होता. याचा परिणाम खरीपातील सोयाबीन, उडीद यावर झाला असला तरी ऊसाचेही उत्पादन घटण्याची शक्यता वर्तीवली जात आहे. 8 सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्यावतीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली जात होती. शिवाय आगामी काळात उर्वरीत ठिकाणचीही पाहणी केली जाणार असल्याचे कृषी अधिकारी बी.व्ही. वीर यांनी सांगितले आहे.

सोयाबीनपेक्षा ऊसाचे अधिकचे नुकसान

लातुर तालुक्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याहे मांजरा नदी काठच्या परीसरात ऊसाची लागवड वाढली होती. गेल्या चार दिवसांपासून याच पट्ट्यात अधिकचा पाऊस झाल्याने ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोयाबीनचे केवळ 5 हेक्टर नुकसान दाखिवल्याहे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळीवणे गरजेचे

जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने थैमान घातल्याने सोयाबीनसह बागायत क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती ठरवून दिलेल्या अॅपद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे. त्यानंतरच नुकसानीची मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी ऊस उत्पादकाचे नुकसान

गतवर्षी चांगला दर असतानाही केवळ ऊस कारखान्यावर घालण्याच्या प्रसंगी वादळी वारे सुटल्याने ऊसाची पडझड झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी ऊसाचे क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवले. यंदाही ऐन वेळीच पावसाची अवकृपा झाली आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

इतरही बातम्या :

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांत जोरदार राडा, 6 गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा

अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वरच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? किरीट सोमय्यांचा सवाल

पंतप्रधान मोदींच्या 71 व्या वाढदिवसासाठी भाजपचा मास्टरप्लॅन तयार, अभियानातले 11 मोठे मुद्दे

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...