AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत.

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 19, 2021 | 3:47 PM
Share

बंगळुरु: कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत. मात्र, सिदप्पा यांनी शेती सुरु केली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. सामान्य शेतकऱ्यांसारखे ती पारंपारिक शेती करायचे, त्यावेळी शेतीतून मिळणारं उत्पन्न देखील अगदीच सामान्य होतं. (Karnataka farmers earning from coconut farming and gave job opportunity for others)

डीडी किसानच्या रिपोर्टनुसार सिदप्पा त्यांच्या शेतामध्ये बाजरी, धान यासारखी पिकं घेत होते. या पिकांना पाण्याची जास्त गरज होती. मात्र, सिदप्पा यांच्याकडे थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यानं सिंचनासाठी अधिक खर्च येत असे. सिदप्पा यांनी त्यामुळे काहीतरी वेगळ करण्याचं ठरवलं. कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकाशी त्यांनी संपर्क सादला. त्यांच्या सल्ल्यानुसर पाणी उपलब्धतेवर आधारित पिकाची शेती करण्याचं ठरवलं. जमिनीचा पोत आणि मातीची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांनी नारळाची झाडं लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला थोड्या क्षेत्रात याची लागवड करण्यातल आली होती.

वर्षभर नारळाचं उत्पादन

नारळ शेतीतून फायदा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर सिदप्पा यांनी त्यांची संख्या वाढवली. हे करत असताना सिदप्पा यांनी वेगवेगळ्या प्रकारची नारळाची झाडं लावली. सिदप्पा आता शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये नारळ पाठवतात आणि त्याची चांगली कमाई करतात. सिदप्पा सांगतात की पारंपारिक शेतीतून केवळ घराचा खर्च चालतो. नारळ विक्रीपासून येणाऱ्या पैशांची ते बचत करतात. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर नारळाच्या शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी ते जमीन खरेदी करतात.

अनेकांना रोजगार उपलब्ध

सिदप्पा सांगतात सुरुवातीच्या दिवसांमध्ये थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, काम सुरु केल्यानंतर मागं वळून पाहण्याची गरज लागली नाही. शेतात कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्नाटकातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी सिदप्पा यांच्या नारळ शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी येतात.

सिदप्पा यांच्या जवळपासचे लोक रोजगाराच्या शोधात दुसरीकडे जात होते. मात्र, सिदप्पा यांनी नारळ शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सिदप्पा यांच्या शेतात अनेक प्रकारची काम वर्षभर सुरु असतात त्यामुळे अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

संबंधित बातम्या:

जळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना

Maharashtra Rain: पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट

Karnataka farmers earning from coconut farming and gave job opportunity for others

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?