AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत.

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 3:47 PM
Share

बंगळुरु: कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत. मात्र, सिदप्पा यांनी शेती सुरु केली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. सामान्य शेतकऱ्यांसारखे ती पारंपारिक शेती करायचे, त्यावेळी शेतीतून मिळणारं उत्पन्न देखील अगदीच सामान्य होतं. (Karnataka farmers earning from coconut farming and gave job opportunity for others)

डीडी किसानच्या रिपोर्टनुसार सिदप्पा त्यांच्या शेतामध्ये बाजरी, धान यासारखी पिकं घेत होते. या पिकांना पाण्याची जास्त गरज होती. मात्र, सिदप्पा यांच्याकडे थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यानं सिंचनासाठी अधिक खर्च येत असे. सिदप्पा यांनी त्यामुळे काहीतरी वेगळ करण्याचं ठरवलं. कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकाशी त्यांनी संपर्क सादला. त्यांच्या सल्ल्यानुसर पाणी उपलब्धतेवर आधारित पिकाची शेती करण्याचं ठरवलं. जमिनीचा पोत आणि मातीची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांनी नारळाची झाडं लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला थोड्या क्षेत्रात याची लागवड करण्यातल आली होती.

वर्षभर नारळाचं उत्पादन

नारळ शेतीतून फायदा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर सिदप्पा यांनी त्यांची संख्या वाढवली. हे करत असताना सिदप्पा यांनी वेगवेगळ्या प्रकारची नारळाची झाडं लावली. सिदप्पा आता शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये नारळ पाठवतात आणि त्याची चांगली कमाई करतात. सिदप्पा सांगतात की पारंपारिक शेतीतून केवळ घराचा खर्च चालतो. नारळ विक्रीपासून येणाऱ्या पैशांची ते बचत करतात. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर नारळाच्या शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी ते जमीन खरेदी करतात.

अनेकांना रोजगार उपलब्ध

सिदप्पा सांगतात सुरुवातीच्या दिवसांमध्ये थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, काम सुरु केल्यानंतर मागं वळून पाहण्याची गरज लागली नाही. शेतात कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्नाटकातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी सिदप्पा यांच्या नारळ शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी येतात.

सिदप्पा यांच्या जवळपासचे लोक रोजगाराच्या शोधात दुसरीकडे जात होते. मात्र, सिदप्पा यांनी नारळ शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सिदप्पा यांच्या शेतात अनेक प्रकारची काम वर्षभर सुरु असतात त्यामुळे अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

संबंधित बातम्या:

जळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना

Maharashtra Rain: पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट

Karnataka farmers earning from coconut farming and gave job opportunity for others

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.