AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango : फळधारणेनुसारच होणार यंदा आंब्याची आवक, उत्पादनही घटले अन् दरही

नैसर्गिक संकटाचा सामना करुन कोकणातला आंबा मार्केटमध्ये दाखल झाला असला तरी अवकाळीच्या नुकासनीच्या खुणा ह्या कायम आहेत. कारण ज्या काळात हंगाम जोमात असतोय त्या दरम्यान वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली आहे. हवामानातील बदलामुळे हंगामाच्या सुरवातीलाच हे चित्र निर्माण झाले आहे. वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहचल्या असल्या तरी यामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 हजार तर मंगळवारी 24 हजार पेट्यांचीच आवक झाली आहे.

Mango : फळधारणेनुसारच होणार यंदा आंब्याची आवक, उत्पादनही घटले अन् दरही
हापूस आंब्याची आवक घटली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 31, 2022 | 10:27 AM
Share

रत्नागिरी : नैसर्गिक संकटाचा सामना करुन (Kokan Mango) कोकणातला आंबा मार्केटमध्ये दाखल झाला असला तरी (Unseasonable Rain) अवकाळीच्या नुकासनीच्या खुणा ह्या कायम आहेत. कारण ज्या काळात हंगाम जोमात असतोय त्या दरम्यान (Washi Market) वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली आहे. हवामानातील बदलामुळे हंगामाच्या सुरवातीलाच हे चित्र निर्माण झाले आहे. वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहचल्या असल्या तरी यामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 हजार तर मंगळवारी 24 हजार पेट्यांचीच आवक झाली आहे. उत्पादनात काळाच्या ओघात वाढ होईल पण घटत्या दराचे काय? असा प्रश्न आता आंबा उत्पादकांसमोर आहे. सध्या आंब्याच्या पेटीला 1 हजार 500 ते 4 हजार 500 असा दर मिळत आहे. मात्र, हंगामाची सुरवात आणि आता मार्केटमध्ये आंबा दाखल होऊन देखील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

15 दिवसांनी वाढणार आवक

निसर्गाच्या लहरीपणावर यंदा आंब्याचा बहर राहिलेला आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु होताच मोहर लागला परंतु, अवकाळी पावसामुळे आलेला मोहर फळाला आलाच नाही. परिणामी मोहर कुजला होता. त्यामुळे यंदा मार्चमध्ये मिळणारे उत्पादन हे शेतकऱ्यांच्या हातून निसटलेले आहे. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेतील आवक ही घटली आहे. बागायतदारांच्या मते 10 एप्रिलनंतर आंब्याची आवक ही वाढणार आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे. केवळ 25 टक्केच उत्पादन पदरी पडल्याचे उत्पादक संघाने सांगितले आहे.

दुष्काळात तेरावा, दरातही घट

उत्पादनात घट झाली तर दर हे वाढीव मिळतात हेच बाजारपेठेचे सूत्र आहे. पण आंब्याबाबत असे होताना पाहवयास मिळत नाही. अवकाळीचा परिणाम केवळ उत्पादनावरच नाही तर आंब्याच्या दर्जावरही झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत. 1 हजार 500 ते 4 हजार 500 रुपयांना आंब्याच्या पेटीची विक्री होत आहे. त्यामुळे यंदा आंब्यातून अधिकचे उत्पादन मिळते की नाही अशी अवस्था झाली आहे. शिवाय 10 एप्रिल नंतर आवक वाढल्यानंतर दराचे काय होणार हा देखील मोठा प्रश्न आहे.

आवकमध्ये असा झाला फरक

गतआठवड्यापर्यंत वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक ही 20 ते 25 हजार पेट्यांची होती. त्यामुळे आता कुठे सर्वकाही सुरळीत होणार असे चित्र होते. पण या आठवड्याची सुरवातच चिंताजनक राहिलेली आहे. सोमवारी 29 हजार पेट्या तर मंगळावारी थेट 24 हजार पेट्यांचीच आवक झाली. नोव्हेंबरमधील मोहरला अवकाळीचा फटका बसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे आगामी काळात आवक वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांना आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार, काय आहे Planning?

Organic Farm : केंद्र सरकारचा भर, सेंद्रीय शेतीवर, 50 हजारांची मदत अन् योजनांचाही लाभ मिळणार

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

Follow Us
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल