AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango : फळधारणेनुसारच होणार यंदा आंब्याची आवक, उत्पादनही घटले अन् दरही

नैसर्गिक संकटाचा सामना करुन कोकणातला आंबा मार्केटमध्ये दाखल झाला असला तरी अवकाळीच्या नुकासनीच्या खुणा ह्या कायम आहेत. कारण ज्या काळात हंगाम जोमात असतोय त्या दरम्यान वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली आहे. हवामानातील बदलामुळे हंगामाच्या सुरवातीलाच हे चित्र निर्माण झाले आहे. वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहचल्या असल्या तरी यामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 हजार तर मंगळवारी 24 हजार पेट्यांचीच आवक झाली आहे.

Mango : फळधारणेनुसारच होणार यंदा आंब्याची आवक, उत्पादनही घटले अन् दरही
हापूस आंब्याची आवक घटली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 31, 2022 | 10:27 AM
Share

रत्नागिरी : नैसर्गिक संकटाचा सामना करुन (Kokan Mango) कोकणातला आंबा मार्केटमध्ये दाखल झाला असला तरी (Unseasonable Rain) अवकाळीच्या नुकासनीच्या खुणा ह्या कायम आहेत. कारण ज्या काळात हंगाम जोमात असतोय त्या दरम्यान (Washi Market) वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली आहे. हवामानातील बदलामुळे हंगामाच्या सुरवातीलाच हे चित्र निर्माण झाले आहे. वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहचल्या असल्या तरी यामध्ये वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 हजार तर मंगळवारी 24 हजार पेट्यांचीच आवक झाली आहे. उत्पादनात काळाच्या ओघात वाढ होईल पण घटत्या दराचे काय? असा प्रश्न आता आंबा उत्पादकांसमोर आहे. सध्या आंब्याच्या पेटीला 1 हजार 500 ते 4 हजार 500 असा दर मिळत आहे. मात्र, हंगामाची सुरवात आणि आता मार्केटमध्ये आंबा दाखल होऊन देखील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

15 दिवसांनी वाढणार आवक

निसर्गाच्या लहरीपणावर यंदा आंब्याचा बहर राहिलेला आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु होताच मोहर लागला परंतु, अवकाळी पावसामुळे आलेला मोहर फळाला आलाच नाही. परिणामी मोहर कुजला होता. त्यामुळे यंदा मार्चमध्ये मिळणारे उत्पादन हे शेतकऱ्यांच्या हातून निसटलेले आहे. याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेतील आवक ही घटली आहे. बागायतदारांच्या मते 10 एप्रिलनंतर आंब्याची आवक ही वाढणार आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे. केवळ 25 टक्केच उत्पादन पदरी पडल्याचे उत्पादक संघाने सांगितले आहे.

दुष्काळात तेरावा, दरातही घट

उत्पादनात घट झाली तर दर हे वाढीव मिळतात हेच बाजारपेठेचे सूत्र आहे. पण आंब्याबाबत असे होताना पाहवयास मिळत नाही. अवकाळीचा परिणाम केवळ उत्पादनावरच नाही तर आंब्याच्या दर्जावरही झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर घसरले आहेत. 1 हजार 500 ते 4 हजार 500 रुपयांना आंब्याच्या पेटीची विक्री होत आहे. त्यामुळे यंदा आंब्यातून अधिकचे उत्पादन मिळते की नाही अशी अवस्था झाली आहे. शिवाय 10 एप्रिल नंतर आवक वाढल्यानंतर दराचे काय होणार हा देखील मोठा प्रश्न आहे.

आवकमध्ये असा झाला फरक

गतआठवड्यापर्यंत वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक ही 20 ते 25 हजार पेट्यांची होती. त्यामुळे आता कुठे सर्वकाही सुरळीत होणार असे चित्र होते. पण या आठवड्याची सुरवातच चिंताजनक राहिलेली आहे. सोमवारी 29 हजार पेट्या तर मंगळावारी थेट 24 हजार पेट्यांचीच आवक झाली. नोव्हेंबरमधील मोहरला अवकाळीचा फटका बसल्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे आगामी काळात आवक वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांना आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार, काय आहे Planning?

Organic Farm : केंद्र सरकारचा भर, सेंद्रीय शेतीवर, 50 हजारांची मदत अन् योजनांचाही लाभ मिळणार

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली