मुंबईकरांनी मिळणार पनवेलची स्ट्रॉबेरी, महाबळेश्वरला जाण्याची चिंता मिटली

सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरीची रोपं आणून यशस्वी लागवड केली. Strawberry Farming at Panvel

मुंबईकरांनी मिळणार पनवेलची स्ट्रॉबेरी, महाबळेश्वरला जाण्याची चिंता मिटली
पनवेलमध्ये स्ट्रॉबेरी शेती
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 7:21 PM

नवी मुंबई: स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आठवतं. राज्यातील प्रगतीशील शेतकरी वेगवेगळ्या भागात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करत आहेत. पनवेलमध्ये महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाबळेश्वर येथून रोप आणून पनवेल येथील शेतीत हा प्रयोग करण्यात आला होता. तर महाबळेश्वरची स्ट्राबेरी शेती पनवेल मध्ये यशस्वीरीत्या करण्यात आल्याने परिसरातील लोकांना नवल वाटत आहे. अति थंडी असणाऱ्या वातावरणातच स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते, हे समीकरण पनवेल येथील सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी बदलले आहे. पवार यांच्या प्रयोगशीलतेचे प्रांताधिकारी दत्ता नवले यांनी कौतुक केले आहे (Sajjan Pawar and Prashant Pawar sucessfully did strawberry farming at Panvel)

महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरीची रोपं मागवली

सज्ज पवार आणि प्रशांत पवार त्यांच्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरीची रोपं आणून लागवड केली. पनवेलमध्ये स्ट्रॉबेरीला आवश्यक हवामान नसतानादेखील पवार यांनी स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. स्ट्रॉबेरीच्या झाडांची निगा राखल्यानं केवळ दिड महिन्यात त्यांना उत्पादन चालू झाले आहे. हिवाळ्यातील थंडीच्या कालावधीचा अभ्यास करुन योग्य लागवड केल्यास पनवेल सारख्या भागात स्ट्रॉबेरीची लागवड करता येऊ शकते, पवार यांच्या यशस्वी प्रयोगावरुन दिसून येते.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोपांची लागवड

पवार बंधूनी थंडी सुरु होताच महाबळेश्वर येथून रोप आणण्यात आले होते. जानेवारी महिन्यात लावण्यात आलेल्या झाडाला दिडच महिन्यात 50 ते 100 ग्रॅमचे 8 ते 10 फळे आली आहेत. लाल भडक रंग, मोठा आकार व चवीला गोड असलेले फळ आणि जवळपास 200 ते 250 रुपये किलोला विकलं जातेय. त्यामुळे या प्रयोगासाठी केलेल्या कष्टाचे चिज झाल्याचे समाधान पवार कुटुंबियांना आहे.

सज्जन पवार आणि प्रशांत पवार यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर आणि कृषी प्रदर्शनात स्ट्राबेरी शेती पिकाची माहिती घेतल्यानंतर हा प्रयोग करण्याचे ठरवले. परंतु, फक्त माहिती न घेता खऱ्या अर्थाने हा वेगळा प्रयोग शेतकऱ्याने सत्यात उतरवला आहे. शिवाय कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय शेती केल्याने हा प्रयोग आदर्शवत मानला जात आहे. हा प्रयोगशील प्रयत्न पाहून पनवेल प्रांत अधिकारी दत्ता नवले यांनी पवार बंधूंचे कौतुक केले आहे. तर रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून याबाबत इतर शेतकऱ्यांना मागर्दर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात फक्त महाबळेश्वरच नाही, या जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पादन होतं!

एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची ताकद फक्त शेतीत, मंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉबेरीच्या शेतात

(Sajjan Pawar and Prashant Pawar successfully did strawberry farming at Panvel)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.